
भोग सरू दे उन्हाचा
₹90.00
कवी कैलास दौंड यांची कविता आजच्या ग्रामीण वास्तवाचे प्रखर आणि जीवघेणे दर्शन घडविणारी आहे. उद्ध्वस्त होत जाणारी मराठी गावं, तेथील शेतीची झालेली संपूर्ण वाताहत, बेभरवशाचा पाऊस, कधी मुळीच न पडणाऱ्या पावसामुळे ओसाड पडणारी रानं, तर कधी अवेळी पडणाऱ्या पावसामुळे हातातोंडाला आलेल्या पिकांची झालेली धूळधाण, त्यातूनच विद्यमान ग्रामीण समाजातून तरुण पिढी ‘देशांतराला’ जाते; म्हणजे कसाबसा जगण्याचा प्रयत्न करू पाहते आहे.
अशा विद्यमान ग्रामीण सामाजिक आशयाची श्री. दौंड यांची कविता आहे.
लेखक : कैलास दौंड / Kailas Daund
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 88
किंमत : रु. 90