भोग सरू दे उन्हाचा

90.00

कवी कैलास दौंड यांची कविता आजच्या ग्रामीण वास्तवाचे प्रखर आणि जीवघेणे दर्शन घडविणारी आहे. उद्ध्वस्त होत जाणारी मराठी गावं, तेथील शेतीची झालेली संपूर्ण वाताहत, बेभरवशाचा पाऊस, कधी मुळीच न पडणाऱ्या पावसामुळे ओसाड पडणारी रानं, तर कधी अवेळी पडणाऱ्या पावसामुळे हातातोंडाला आलेल्या पिकांची झालेली धूळधाण, त्यातूनच विद्यमान ग्रामीण समाजातून तरुण पिढी ‘देशांतराला’ जाते; म्हणजे कसाबसा जगण्याचा प्रयत्न करू पाहते आहे.

अशा विद्यमान ग्रामीण सामाजिक आशयाची श्री. दौंड यांची कविता आहे.

लेखक : कैलास दौंड / Kailas Daund
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 88
किंमत : रु. 90