संत मीराबाई

200.00

लेखकाने म्हटल्याप्रमाणे मलाही, ‘मीराचे जीवन म्हणजे करुणेची वाहती नदी आहे, मीराचे आयुष्य म्हणजे एक सुगंधी जखम होय. या करुणेच्या नदीला अमृताची गोडी लाभलेली आहे. या सुगंधी जखमेला मानवतेचा गंध लाभला आहे. हे अमृत नासणारे नाही. हा गंध काळाच्या तडाख्यात सुकणारा नाही, याची मनोमन खात्री वाटते.’ इतके सर्वांगसुंदर नि गुणसमृद्ध चरित्रलेखन मराठी वाचकांच्या हाती दिले याबद्दल मी श्री. सूर्यवंशी यांचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांना मनापासून धन्यवादही देतो आणि सामान्य माणसाला जगण्याचे बळ पुरविणाऱ्या सामान्यातल्या ‘असामान्य’ थोरांचा त्यांनी चरित्रलेखनातून उपक्रम चालू ठेवावा, अशी अपेक्षा करतो. – डॉ. द. ता. भोसले

लेखक : अभिमन्यू सूर्यवंशी / Abhimanyu Suryavanshi
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 156
किंमत : रु. 200