
बळीचं जिणं
₹100.00
हाती घेऊन गाडगं भटकतो रानीवनी। अवकृपा निसर्गाची नाही नाडग्यात पाणी काळ्या ढेकळांच्या संगे त्याची खुले भाग्यरेषा। ऊन सावलीचा खेळ रोज जीवन-तमाशा’ दयाराम गिलाणकरांच्या कवितेतील वरील ओळी वाचल्यानंतर शेतीमातीत राबता राबता आयुष्याचीच माती झालेल्या कित्येक पिढ्यांचं दुःख काळजाला चटका लावून जातं. जिथे काळजाला चटका बसतो तो शब्द अस्सल असतो.
गिलाणकरांच्या शब्दांचंही असंच आहे. ‘बाप माझा शेतकरी राब-राबतो उन्हात । काळं हिरवं करून स्वप्न पेरतो मनात…’ शेतकऱ्याच्या जीवनात दुःख हे एखाद्या इनामासारखं बांधून आलेलं असतं. उन्हातान्हात कष्ट करून वाट्याला दुःखाचीच रास येणार हे समजूनही तो उद्याचं हिरवं स्वप्न पाहतो आणि रोज आतडी पिळवटली तरी कधीतरी देव कष्टाला पावेल ह्या भरवशावर आशेची पेरणी करत राहतो.
लेखक : दयाराम गिलाणकर / Dayaram Gilankar
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 80
किंमत : रु. 100