सूर्य गेला नाही अजून अस्ताला

150.00

विनायाक हिरवे (पारनेरकर) यांनी लिहिलेला ‘सूर्य गेला नाही अजून अस्ताला’ हा काव्यसंग्रह मिळाला. विविध सामाजिक विषयावर लिहिलेल्या कविता या पुस्तकातून वाचायला मिळतात. महाराष्ट्रीयन जनतेचे भाग्य आहे की, मराठी साहित्य क्षेत्र संपन्न आहे. सामाजिक भान असलेल्या तरुणांच्या लेखणीतून मराठी साहित्य अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न होतोय.

विनायक हिरवे हे त्यापैकी एक. त्यांनी आपल्या अवतीभवतीच्या निरिक्षणातून जाणवलेल्या विविध पैलूंना या पुस्तकातील कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

लेखक : विनायक हिरवे / Vinayak Hirve
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 72
किंमत : रु. 150