पुस्तक परिचय-परिक्षणे

काळे पाणी

ब्रिटिश राज्यकर्त्यांनी ‘माझी जन्मठेप’ पुस्तकावर दि. १७ एप्रिल १९३४ ला बंदी घातली. म्हणून सावरकरांनी ‘काळे पाणी’ ही दुसरी कादंबरी लिहिली. यात त्यांनी अंदमानच्या बंदीगृहातील अत्यंत कष्टकारक, तापदायक, अमानुष गुंडगिरीचे जीवन कसे जगावे लागते होते, ते दर्शविले आहे. हे कथानक एका बंदिवानाच्या न्यायालयातील अभियोगावर आधारलेले आहे. […]

पुस्तक परिचय-परिक्षणे

श्री राजा शिवछत्रपती

हे एका इतिहास – संशोधकाने लिहिलेले साधार शिवचरित्र असले तरी ते केवळ संशोधकांसाठी लिहिलेले आहे असे मात्र नाही. कोणाहि सामान्य वाचकाला सहज समजू शकेल अशा भाषेत ते लिहिलेले आहे आणि म्हणूनच अनेक वृत्तपत्रांनी त्याचे भरपूर कौतुकही केले आहे. […]

पुस्तक परिचय-परिक्षणे

नरवीर तान्हाजी मालुसरे (चरित्र)

आधी लग्न कोंढाण्याचे! मग माझ्या रायबाचे! अर्थात राष्ट्र प्रथम! ही राष्ट्रभक्ती ज्यांनी शिकवली त्या नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावरील चरित्र पुस्तक! […]

पुस्तक परिचय-परिक्षणे

२६-११ मुंबईवरील हल्ला

कराचीहून सागर मार्गाने आलेले दहशतवादी, साठ तास देशाच्या आर्थिक राजधानीत रक्तरंजित थैमान घालतात; त्याची ही प्रत्यक्षदर्शी कहाणी. […]

पुस्तक परिचय-परिक्षणे

नवभारताचे शिल्पकार

देशाच्या आर्थिक विकासात वेगवेगळ्या उद्योगांचा वाटा मोठा आहे. या उद्योजकांची वाटचाल कशी झाली याविषयी सर्वसामान्यांना कुतुहल असते. अनेक उद्योजकांची वाटचाल संघर्षमय होती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी यश मिळवले आणि देशातील आघाडीचे उद्योजक म्हणून स्थान मिळवले. अशा काही आघाडीच्या उद्योजकांशी संवाद साधून ज्येष्ठ पत्रकार वीर संघवी यांच्या लेखणीतून ‘नवभारताचे शिल्पकार’ हे पुस्तक साकारलं आहे. […]

पुस्तक परिचय-परिक्षणे

आठवणीतलं पुस्तक – ‘मुंबई दिनांक’

तीन दशकांहून अधिक काळ उलटून गेल्यावर लक्षात येतं, ते हे की पुढचं आपलं सारं आयुष्य ‘मुंबई दिनांक:’ या दोन शब्दांनी सुरु होणार्‍या बातम्या लिहिण्यातचं गेलं, त्यामागे या पुस्तकाचीच प्रेरणा कारणीभूत होती. आज या पुस्तकाचं कथानक महाराष्ट्रातल्या घराघराला ठाऊक झालं आहे. १९७२ साली ‘मुंबई दिनांक :’ हे पुस्तक प्रकाशित झालं आणि नंतरच्या पाच वर्षातच साधूंची ‘सिंहासन’ ही आणखी एक कादंबरी आली. त्या दोहोंच्या उत्कृष्ट मिलाफातून जब्बार पटेल यांनी ‘सिंहासन’ हा चित्रपट काढला आणि या दोन्ही कादंबर्‍या घराघरांत जाऊन पोहोचल्या. […]

पुस्तक परिचय-परिक्षणे

पानिपत – विश्वास पाटील

बहुतेक इतिहासकालीन कादंबर्‍या वा नाटकं गतकालाचा गौरव करणार्‍या असतात. पानिपत अशा सर्व साहित्यापेक्षा वेगळी ठरते, याचं कारण पाटील हे सतत भूत-वर्तमान आणि भविष्य यांचं भान ठेवून या महासंग्रामाकडे पाहत राहिले आणि त्यातूनच मराठी लष्कर, त्याबरोबर गरज नसताना पुण्याहून गेलेले आणि पुढे अत्यंत अडचणीचे ठरलेले कुटुंबकबिले व बाजारबुणगे यांची हजारो मैलांची दौड आणि त्यांना पाठीशी घालत सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली झालेली लढाई यांचं अत्यंत प्रत्ययकारी तसंच वास्तवदर्शी चित्रण उभं राहिलं. […]