
राष्ट्रपिता महात्मा गांधी
₹30.00
भारत देश हा महापुरुषांची भूमी म्हणून ओळखला जातो. येथे अनेक महापुरुषांनी जन्म घेतला. श्रीराम, श्रीकृष्ण यांचेसारखे महान देवता पण याच भूमीवरचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले; परंतु त्यांचे हे स्वप्न पूर्ण केले येथील स्वातंत्र्यसैनिकांनी. त्यामध्ये सर्वात अग्रक्रमाने नाव घेतले जाते ते म्हणजे महात्मा गांधी यांचे.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात रामराज्य येईल असे गांधीजींचे स्वप्न होते. केवळ स्वातंत्र्यासाठी न लढता देशात समता, बंधुता प्रस्थापित करून स्वराज्य स्थापन करणे तसेच आदर्श राज्यकर्त्यांची निर्मिती करून देशात ‘सुराज्य’ स्थापित करणे यालाच गांधीजींनी आपल्या जीवनाचे ध्येय बनवले होते.
लेखक : मृण्मयी पाटील / Mrunmayi Patil
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 32
किंमत : रु. 30