शाहू महाराज : चरित्र आणि कार्य

30.00

महाराष्ट्र भूमी ही नररत्नांची खाण आहे. थोरले आबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले. रयतेचा राजा ही बिरुदावली लोकांनीच त्यांना बहाल केली.

तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटले आहे की, ‘कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक । तयाचा हारिख वाटे देवा ।’ याचा अर्थ पूर्वसुरींचे कर्तृत्व, त्याग, समाजाविषयी तळमळ हे गुण जेव्हा पुढील पिढ्यांमध्ये येतात त्याचा आनंद देवादिकांना देखील होतो. छत्रपती संभाजी राजेंच्या बलिदानानंतर राजाराम महाराजांच्या पत्नी ताराराणी यांच्या काळातच सातारा व कोल्हापूर अशा दोन गाद्या निर्माण झाल्या.

लेखक : मृण्मयी पाटील / Mrunmayi Patil
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 32
किंमत : रु. 30